शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत सरकारकडून राज्यात फसवणुकीचाच खेळ: धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:53 IST

कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे ...

कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली सरकार या समाजबांधवांना फसवित आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागज येथे केली.नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आ. सुमनताई पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते.मुंडे म्हणाले, या सरकारने देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ची खोटी स्वप्ने दाखवली. काळे धन देशात आणले नाही, की १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत एसटीचे आरक्षण देतो असे सांगितले होते; पण अशा अनेक बैठका होऊनही आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे.ते म्हणाले, भाजप हा संघाच्या विचारावर चालणारा जातीवादी पक्ष आहे. त्यामुळे धनगर समाजाला हे सरकार आरक्षण देणार नाही. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबद्दल शंका आहे. जर आरक्षण टिकले नाही, तर भाजप मराठा समाजाला फसवतोय, हे स्पष्ट होईल.आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, दोन महिने झाले तरी प्रशासन टँकर देत नाही, तलाव भरून देत नाही. प्रशासन आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. याला भाजप सरकार जबाबदार आहे. आज आबा असते तर ही परिस्थिती आली असती का?प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा भाजप सरकारचा डाव आहे.भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिटराज्य सरकारमधील १६ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्याचे पुरावेही मी दिले. परंतु त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. हे या सरकारचे महापाप आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.खासदारांना घरी बसवामुंडे म्हणाले, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आता आर. आर. आबा नसल्याने जनतेच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सुमनताई पाटील यांना ताकद द्या. या जिल्ह्यात पाण्याचे राजकारण केले जातेय. येथील खासदार पाण्याचे राजकारण करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. त्यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.